३४)कर्माच्या अटळ सिद्धांताचा प्रभाव भक्तिभाव चैतन्यात नष्ट होतो का?

उत्तर – भक्तिभाव चैतन्यात राहिल्यामुळे उद्धाराचा मार्ग खुला होतो व थोड्या प्रतीक्षेनंतर भक्त पापमुक्त होतो, म्हणजेच भक्तिभाव चैतन्यात राहिल्यामुळे ’कर्माच्या अटळ सिद्धांताचा’ प्रभाव नष्ट होण्यास मदत होते.
पापाचे ’पाप’पण आणि पुण्याचे ’पुण्य’पण ह्या दोन्ही गोष्टींपासून तो स्वयंभगवान अलिप्त असतो. हा स्वयंभगवान फक्त भक्तिभाव चैतन्यातच लिप्त होतो. स्वयंभगवान श्रीकृष्णांनी भगवद्‌गीतेतील ९व्या अध्यायातील ३०व्या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे – जर कुणी अत्यंत दुराचारी माझे अनन्यभावाने भजन करतो, तर त्याने फार चांगल्या रितीने भक्तीचा निश्चय केलेला आहे म्हणून त्याला पवित्रच मानले पाहिजे.
खरा सद्‍गुरु तो स्वयंभगवान स्वतः एकच एक आहे व शुभात्रेयीने केलेला त्याचा मंत्रगजर अशा सुदुराचार्‍यांना अर्थात जे अत्यंत व सांगोपांग दुराचारी आहेत, ज्यांनी पापांची अंतिम मर्यादा ओलांडली आहे, ज्यांना कुठलेही पाप करायचे शिल्लक ठेवलेले नाही, अशा मूढांनासुध्दा, त्यांनी भक्तिभाव चैतन्यात प्रवेश केल्यास पापहीन करतो.

Scroll to top