१२) कर्मस्वातंत्र्य म्हणजे काय?

उत्तर – प्रत्येक मानवाच्या अंतर्मनात सर्व प्रकारची बीजे असतातच. चांगल्या व वाईट, शुद्ध व अशुद्ध अशा दोन्ही प्रकाराची बीजे एकत्रच नांदत असतात. ह्यातले कुठले बीज कधी उगवेल व वाढू लागेल हे माझ्या प्रारब्धानुसार ठरते,

परंतु उगवलेले कुठले रोप वाढू द्यायचे व कुठले रोप त्याचा समुळ नायनाट होईपर्यंत कापत रहायचे, हे मात्र माझ्या हातात असते. ह्यालाच ’कर्मस्वातंत्र्य’ असे म्हणतात.

Scroll to top