उत्तर – जेव्हा आस्तिक्यबुद्धी जीवात्म्याच्या मूळ स्थानाची माहिती करून घेते व त्या प्रयत्नात सभोवतालच्या विश्वाचा अभ्यास करते, तेव्हा ह्या परमात्म्याच्या सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूळ गुणांची ओळख पटते, विश्वातील प्रत्येक क्रियेत वा प्रतिक्रियेत ह्या त्रिसूत्रीचा अनुभव येऊ लागतो.
हाच ह्या सर्व जगताचा एकमेव कर्ता व करविता हा दृढ निश्चयय होतो. तीच ती श्रद्धा.
सामान्य मनुष्यसुद्धा ‘चिंतन’, ‘मनन’, ‘शोध’ इत्यादि मोठमोठे शब्द माहीत नसतानादेखील स्वत:च्या व्यावहारिक अनुभवातून व दैनंदिन घडामोडीतून निर्माण झालेल्या जाणीवेतून ‘श्रद्धा’ शिकतो, केवळ कुणी मनावर बिंबविले, वारंवार ठासून सांगितले म्हणून श्रद्धा उत्पन्न होत नाही.
मात्र ह्या जन्मात सहजतेने श्रद्धाभाव निर्माण होणे, हा माझ्या पूर्वजन्मातील श्रद्धेचा अपरिहार्य परिणाम असतो.